लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

आषाढी वारीचं नियोजन ठरलं…

आषाढी वारीचं नियोजन ठरलं आहे. यंदा वारीचं नियोजन नेमकं कस असणार हे पाहुयात.. येत्या आषाढी वारीला जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी २० जूनला तर संत ज्ञानेश्वर माउलींची पालखी २१ जूनला पंढरपूराकडे प्रस्थान करणार आहे. यावर्षी तिथी वाढ असल्यानं इंदापूर मध्ये पालखीचा एक मुक्काम वाढेल. तसेच अंथुर्णे येथे पालखी मुक्कामी असणार आहे.

यंदा संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे ३३७ वे वर्ष आहे. संतोष मोरे, माणिक मोरे, विशाल मोरे यांची
पालखी सोहळ्याच्या प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. १० जुलैला पंढरपुरात आषाढी एकादशीचा महासोहळा होणार आहे. देहूच्या इनामदार वाड्यातून तुकोबांची पालखी २० जूनला प्रस्थान करेल. या सोहळ्यात ३२९ नोंदणीकृत दिंड्या आहेत. २०० हुन अधिक मोकळ्या दिंड्यांची संख्या आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदी येथून प्रस्थान करेल. यंदा वारी मोठ्या प्रमाणात भरण्याची शक्यता आहे.

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani