“दिवाळीनंतर सहा लोकांचे फटाके फोडणार…”
भ्रष्टाचाराबाबद दिवाळीनंतर सर्वांचे फटाके फुटणार असा इशारा किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारला दिलाय.
पिंपरी |लोकवार्ता-
ठाकरे सरकारवर किरीट सोमय्या यांनी गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहे. या भ्रष्टाचाराबाबत दिवाळीनंतर ६ जणांचे फटाके फोडणार आहे. यात ३ मंत्री आणि ३ जावई असल्याचं किरीट सोमय्या यांनी सांगितलं. त्यांनी लवंगी फटाके फोडले, मी मात्र एकदम बॉम्ब फोडणार आहे, असाही सोमय्यांनी दावा केला. ठाकरे आणि पवारांनी महाराष्ट्रात वसुली सरकार निर्माण केल्याचाही आरोप त्यांनी केला. ते मलाड पूर्वमध्ये भाजपा दिंडोशी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधताना बोलत होते.

किरीट सोमय्या म्हणाले, “सध्या दिवाळी सण येतोय, दिवाळीत फटाके फोडतात. मात्र, किरीट सोमय्या दिवाळीनंतर फटाके फोडणार आहे. पूर्ण अर्धा डझन लोकांचे फटाके फोडणार आहे. घोटाळेबाज ठाकरे-पवारांनी १२ दिवस नाटकं केली. यात ३ मंत्र्यांच्या ३ घोटाळ्यांचा आणि त्यांच्या ३ जावयांचा समावेश आहे. ठाकरे सरकारमध्ये जावयांचं राज्य आहे. अजित पवार यांनी त्यांच्या जावयाला खूश केलं. हसन मुश्रीफांनी त्यांच्या जावयाला आणि नवाब मलिकांनी त्यांच्या जावयाला खूश केलं. एकदम बॉम्ब फोडण्याचं काम किरीट सोमय्या करणार आहे. यांनी केवळ लवंगी फटाके फोडले मी मात्र एकदम बॉम्ब फोडणार आहे असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे.