संघटनेच्या बळावर महापालिकेत पुन्हा भाजपची सत्ता येईल
भाजपने सत्तेचा गैरवापर केला

लोकवार्ता । प्रतिनिधी
पिंपरी : भाजप ही संघटना ओरिएंटल पार्टी आहे बूथरचना मजबूत केली आहे त्यामुळे कोणी इकडे तिकडे पळाले तरीही संघटनेच्या बळावर पिंपरी-चिंचवड महापालिकेत पुन्हा भाजपचीच सत्ता येईल असा विश्वास शहर भाजपचे प्रवक्ते अमोल थोरात यांनी व्यक्त केला आहे.. राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी पिंपरीत आले होते यावेळी पत्रकारांशी बोलताना माझ्या संपर्कात भाजपचे बरेचजण आहेत. परंतु मी ज्यांना कोणाला यायचे आहे, त्यांनी आल्यानंतर नगरसेवकपद रद्द होता कामा नये, याची खबरदारी घेण्याचे मी त्यांना सांगतो. ते अपात्र झाले तर सहा वर्ष निवडणूक लढविता येत नाही. आत्ता आलेले अपक्ष आहेत. पत्नी नगरसेवक असेल तर पती आले आहेत. त्यांना पद रद्द होण्याचा त्रास होणार नाही. ज्यांचे ‘इलेक्टिव्ह मेरिट’ आहे त्यांना घेऊ असे सांगितले..
भाजपा प्रवक्ते अमोल थोरात यांनी त्यास उत्तर दिले आहे त्यांनी म्हटले आहे की भाजपचा मतदार जागरूक आहे तो पक्ष सोडून जाणाऱ्यांना जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही बारामती लोकसभा मतदारसंघ असताना लोकसभेला शरद पवार यांनाही पिंपरी-चिंचवडमध्ये मताधिक्य मिळत नसे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर लोकांचा विश्वास आहे त्यामुळे शिवसेनेचे मावळातील खासदार श्रीरंग बारणे यांनाही मदत झाली व पार्थ पवार यांना पराभवाची धूळ चाखावी लागली. चिंचवड विधानसभेतून आ.लक्ष्मणभाऊ जगताप व भोसरी मतदारसंघातून आ.महेशदादा लांडगे हे दिन्हीही भाजपचे आमदार प्रचंड बहुमताने विजयी झाले. ज्या पक्षाला चिंचवड व भोसरी मतदार संघात स्वतःचा उमेदवार सुद्धा देता आला नाही प्रत्यक्षात अपक्ष उमेदवार पुरस्कृत करण्याची नामुष्की ओढवली त्यांनी भाजपावर टीका करणे चुकीचे ठरेल. महापालिका निवडणुकीसाठी भाजपने तयारी केली आहे.शहरातील १३०८ बूथच्या माध्यमातून ३० हजार लोकांपर्यंतची टीम तयार केली गेली आहे. तरुण मतदारांचा भाजपा वर असलेला विश्वास व पक्षसंघटन मजबूत असल्याने भाजप महापालिकेत पुन्हा सत्तेवर येईल असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला आहे
भाजपने सत्तेचा गैरवापर केला
चारचा वॉर्ड करत असताना कुठला भाग काढायचा, कुठला ठेवायचा, कोणत्या नगरसेवकाला त्रास होईल, अशी पद्धतीने भाजपने वॉर्ड रचना केली. आपण काम केले. तर लोक निवडून देणार, वॉर्ड रचनेमध्ये काय आहे, असे मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगायचो. तो भाग काढा आणि हा भाग घ्या, असे काही नसते, असे माझे मत असायचे. परंतु, त्यावेळेस इतकी विकासकामे करुन देखील जनतेने दिलेल्या निर्णायामुळे आम्हाला विरोधी पक्षात बसावे लागले, अशी खंत पवार यांनी बोलून दाखविली. त्यावर टिप्पणी करताना थोरात यांनी म्हटले आहे की, पालिकेत झालेला पराभव लपविण्यासाठी अजित पवार भाजपवर खोटे-नाटे आरोप करत आहेत त्यामुळे जनतेने यांना घरी बसविले हे त्यांनी ध्यानात घेतले पाहिजे असा टोला थोरात यांनी हाणला आहे.