मुख्यमंत्री उद्धव ठाकरे इन ऍक्शन मोड..सर्व आमदारांना बॅग भरून येण्याच्या सूचना
-निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यासाठी पक्षांच्या भूमिका.
पुणे । लोकवार्ता
राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. मुख्यमंत्री ठाकरे मंगळवारी महाविकास आघाडीच्या आमदारांशी संवाद साधणार आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या आमदारांची विशेष बैठक आयोजित करण्यात आलीय.

या बैठकीला काही अपक्षही आमदाराही उपस्थित राहतील अशी शक्यता आहे. भाजपने तीन उमेदवार दिल्यामुळे सहाव्या जागेसाठी चूरस निर्माण आहे. त्यामुळे शिवसेनेने आता आपलं सर्वस्व पणाला लावले आहे. यामुळे मुख्यमंत्री मतदानाआधी सर्व आमदारांशी स्वतः संवाद साधणार आहेत. आमदार फुटू नयेत यासाठी सर्व आमदारांना 10 तारखेपर्यंत एकत्र ठेवलं जाणार आहे.
दरम्यान, शिवेसना नेते संजय राऊत यांनी आम्हीच तीनही जागा जिंकणार असा दावा केला आहे. तर भाजपकडून सांगण्यात आले आहे की, निवडणुकीनंतर समजेल. आम्ही निवडणूक रिंगणात आहोत. याचा अर्थ आम्ही ही निवडणूक जिंकणार असे म्हटले आहे.