“शिवसेनेचं सरकार हे वसुली सरकार झालंय….”
“त्यांना आहे तिथेच ठेवा, इथे आले तर…”, देवेंद्र फडणवीसांनी साधला शिवसेनेवर निशाणा!
पिंपरी ।लोकवार्ता
दादरा नगर हवेतीतील लोकसभा पोट निवडणुकीसाठी प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे. शिवसेनेनं या निवडणुकीत उमेदवार उभा केल्यामुळे या निवडणुकीत वेगळीच रंगत आली आहे. त्यामुळ महाराष्ट्रातील निवडणुकांनंतर हा दोन्ही पक्ष या पोट निवडणुकीत पुन्हा एकदा आमने-सामने उभे ठाकल्यानं दोन्ही बाजूंनी पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. निवडणूक प्रचारादरम्यान आज भाजपाची दादरामध्ये जाहीर सभा झाली. या सभेमध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला आहे.

शिवसेनेकडून महाराष्ट्रात वसुली सरकार चालवलं जात असल्याचं देखील फडणवीस यावेळी म्हणाले. “शिवसेनेचा मुंबईचा इतिहास पाहा. तिथे ते करत असलेलं काम पाहा. जसं तिथे त्यांचं काम सुरू आहे, वसुली सुरू आहे, ते पाहाता महाराष्ट्रातलं सरकार आता सरकार नसून वसुली सरकार झालं आहे. तीच वसुली ते दादरा-नगर हवेलीत आणू इच्छित आहेत”, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकांवेळी झालेल्या चर्चेचा उल्लेख केला. “ते मोदींचं नाव घेऊन निवडून आले आणि काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊन बसले. हे लोक फक्त संधीसाधू आहेत. जेव्हा त्यांना निवडणुका लढायच्या असतात, तेव्हा मोदींची आठवण येते आणि निवडणुका झाल्यावर त्यांना सत्ता दिसू लागते”, असं फडणवीस म्हणाले.