लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

“शेतकरी बंधूंनो काळजी घ्या!”

मावळातील शेतक-यांना पार्थ पवार यांचे भावनिक आवाहन.

पिंपरी | लोकवार्ता-

राज्यभर सुरु असलेल्या अवकाळी पावसात अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे.पुणे जिल्ह्यात देखील 10 तालुक्यांमध्ये शेळ्या, मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर पार्थ पवार यांनी मावळातील शेतक-यांना पशुधनाची काळजी घेण्याचे भावनिक आवाहन केले आहे. याबाबत पार्थ पवार यांनी ट्विट केले आहे.

बुधवारी झालेल्या अवकाळी पावसामध्ये पुणे जिल्ह्यात जनावरांची मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. पुणे जिल्ह्यात पावसामुळे एका दिवसात तब्बल एक हजार 34 शेळ्या-मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. तर एका घराची पडझड झाली आहे.मावळ तालुक्यात बुधवारी 54.03 मिलिमीटर पाऊस पडला. अचानक आलेल्या या पावसाने हवेत गारठाही भरला. पाऊस आणि थंडी असा दुहेरी संकटाचा शेतक-यांना सामना करावा लागत आहे. या गारठ्यामुळे मावळ तालुक्यातील दोन गावांमध्ये 36 मेंढ्या, शेळ्यांचा मृत्यू झाला आहे.

याबाबत शेतक-यांना दिलासा देण्यासाठी पार्थ पवार यांनी ट्विट केले आहे. ‘अवकाळी पावसामुळे राज्यातील विविध भागात शेतीचे खूप नुकसान झाले आहे. मावळसह जिल्ह्यात पशुधन मोठ्या प्रमाणात दगावल्याच्या घटना घडल्या असून, पुढील दोन तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. शेतकरी बंधूंनी पशुधन दगवणार नाही ही काळजी घ्यावी. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत’ असे पवार यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani