“फडणवीसांची जिरवायची हे गडकरींसोबत आधीच ठरलं होतं”
नांदेड इथल्या बिलोली येथे आयोजित प्रचारसभेत विजय वडेट्टीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना हे वक्तव्य केलं आहे.
पिंपरी।लोकवार्ता दि.२२ ऑक्टोबर –
नांदेड इथल्या बिलोली येथे आयोजित प्रचारसभेत विजय वडेट्टीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना हे वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, “नागपूरवाल्यांना माहित आहे. तिकडे भाजपामध्ये दोन टोकं आहेत. एकीकडे देवेंद्र फडणवीस तर दुसरीकडे नितीन गडकरी. दोघांची तोंडं विरुद्ध दिशेला आहेत. दोघांमध्ये ३६ चा आकडा आहे. म्हणून गडकरींनी कानामध्ये गुपचूप सांगितलं की फडणवीसांची जिरवायची होती, तशी ती जिरली. आता पुन्हा जिरवायची आहे. पण कुणाची जिरेल ते कळेल”.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपाला बहुमत जरी मिळालं असलं तरी त्यानंतर घडलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे भाजपा सध्या विरोधी पक्ष म्हणून काम करत आहे. त्यावेळच्या घडामोडींबद्दल आता राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. देवेंद्र फडणवीसांची जिरवायची हे नितीन गडकरींसोबत आधीच ठरवलं होतं, असं ते म्हणाले आहेत.
https://lokvarta.in/wp-admin/post.php?post=10945&action