शहरातील पाणी प्रश्न लवकरच सोडवला जाणार – आमदार महेश लांडगे
आंद्रा धरणातून पाणी उचलण्यासाठी निघोजे येथील इंद्रायणी नदीवरील अशुद्ध जलउपसा केंद्राचे (जॅकेवल) काम अंतिम टप्प्यात.
पिंपरी । लोकवार्ता
आंद्रा धरणातून पाणी उचलण्यासाठी निघोजे येथील इंद्रायणी नदीवरील अशुद्ध जलउपसा केंद्राचे (जॅकेवल) काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या 20 दिवसात निघोजेतून पहिल्या टप्प्यात 50 एमएलडी पाणी उचलले जाईल त्यातून समाविष्ट गावाला पाणीपुरवठा केला जाईल. या भागाचे अतिरिक्तचे पाणी चिंचवडमधील वाकड, पिंपळेनिलख, पिंपळेगुरव, रावेत या गृहनिर्माण सोसायट्या असलेल्या भागाला दिले जाईल… त्यामुळे शहरातील पाणी समस्या काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला.

खासदार बारणे, भाजपचे शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे, भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांनी आज (सोमवारी) संयुक्तपणे चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्राच्या कामाची पाहणी केली. महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी प्रकल्पाबाबतची सविस्तर माहिती दिली. अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, प्रदीप जांभळे, पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, कार्यकारी अभियंता देवांत्रा गट्टुवार, गोंडवाना इंजिनिअर्स लिमिटेड ठेकेदाराचे प्रतिनिधी उपस्थित होते
